दिव्यांग युडीआयडी प्रमाणपत्र, ओळखपत्रासाठी विशेष मोहीम मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांची माहिती
वर्हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी अकोला मनपाच्या वतीने युडीआयडी प्रमाणपत्र व ओळखपत्र काढण्याकरिता 30 जुन 2022 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. शासनाकडून दिव्यांगासाठी विविध योजना राबविल्या जाते.
शासनाच्या या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व दिव्यांग ओळखीसाठी युडीआयडी अर्थात वैयक्तिक प्रमाणपत्र व ओळखपत्र याची दिव्यांग व्यक्तींना गरज भासत असते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुध्दा हे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपयोगात येते. मात्र या युडीआयडी प्रमाणपत्रा संदर्भात दिव्यांगांना माहिती नसल्याने अनेक दिव्यांग व्यक्ती शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत राहतात. ही बाब लक्षात घेवून दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या सुचनेनुसार दिव्यांग व्यक्तींसाठी या विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप पर्यंत युडीआयडी कार्ड काढलेले नाही किंवा ज्यांचेकडे दिव्यांगत्वाचे अन्य विभागाचे प्रमाणपत्र आहे, अशा सर्व दिव्यांगांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वार्ड क्रमांक 106 मधील हेल्प डेस्कची मदत घेउन तपासणी करून युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र नोंदणी करून घ्यावी. युडीआयडी कार्ड नोंदणी करिता दिव्यांग व्यक्तींनी आपले आधार कार्डची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट फोटो, जुने दिव्यांगत्व प्रमाणपत्र असल्यास त्याची प्रत घेउन हेल्प डेस्कच्या मदतीने 30 जून 2022 पुर्वी सुरू असलेल्या विशेष मोहीमेचा लाभ घेउन युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
दामिनी’ app चा वापर करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन
वर्हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला :पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वीज कोसळण्याबाबतची पूर्वसुचना प्राप्त व्हावी यासाठी ‘दामिनी’ हे अॅप तयार केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी, ग्रामस्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच गावातील सामान्य नागरिक यांनी दामिनी ॲप डाऊन लोड करावे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. या ॲपमुळे वीज कोसळण्याच्या 15 मिनीटे आधी वीज कोसळण्याची स्थिती व ठिकाण दर्शविले जाते. तेव्हा दामिनी ॲपच्या माध्यमातून प्राप्त सुचनेचा वापर आपल्या परिसरातील नागरिकांना खबरदारीची पूर्वसुचना देण्यासाठी करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
अग्नीविर योजनेमागे भाजपा व आरएसएसचा गुप्त अजेंडा : अॅड. प्रकाश आंबेडकर
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अग्निपथ योजनेमागे भाजपा व आरएसएसचा गुप्त अजेंडा : अॅड. प्रकाश आंबेडकर
अकोला: केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहिर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाचे लोण देशातील १५ राज्यात पोहचले आहे. आज तिस-या दिवशीही देशात विविध ठिकाणी जाळपोळीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे तर कित्येक जखमी झाले आहेत. देशातील जनतेच्या जीवावर केंद्र सरकार उठले असून अग्निपथ योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल, असा प्लान भाजपा व आरएसएसचा आहे. अशी खळबळजनक टिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अग्निपथ योजनेला वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध असल्याचेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
दिर्घ काळानंतर अकोल्यात ‘दोन’ पॉझिटीव्ह, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
वर्हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला :अकोला शहरात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 139 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश असून ते रेल ता.अकोट व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65183 आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी दिली आहे.
राजपथने रचला इतिहास , 109 तासात 84.400 कि. मी. बिटूमीनस काँक्रीट पेविंग कार्याचा विश्वविक्रम
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
*गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद*
राज पथ इन्फ्राकॉनने रस्ते निर्माण क्षेत्रातील मागील सर्व उच्चांक तोडून राजमुकुट धारण केला
अमरावती / अकोला, ता. ०७ : अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचे ६) वर राज पथ इन्फ्राकॉनने सलग १०९.८८ तासात ४२.२०० किमी बिटूमिनस काँक्रीटचे पेविंग करून जगातील सर्व विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. बुधवारी ता. ७ जून २०२२ रोजी माना कॅम्प येथे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक स्वप्नील डांगरिकर यांनी राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रमाणपत्र सुपूर्द केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी राज पथ इन्फ्राकॉन तर्फे ‘अखंड रस्त्यावर अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंग’ या श्रेणीत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे ठविले.
३ जून रोजी सकाळी ७.२७ वाजता अमरावती जिल्ह्यातील लोणी पासून अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंगच्या कार्याला सुरुवात झाली आणि ७ जून ला रात्री ९.२० वाजता अकोला जिल्ह्यातील नवसाल येथे १०९.८८ तासांनी पेव्हिंगचे कार्य थांबवून ८४.४०० किलोमीटरचा नवीन विश्वारेकॉर्ड राज पथ द्वारे करण्यात आला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने विश्वविक्रम झाल्याचे घोषित करताच, या विक्रमासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आज अखेर फळाला आली. यावेळी उपस्थित कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: आनंदाश्रू तरळले. फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष झाला.’भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘राजपथ…. राजपथ… राजपथ…. ‘असा जयघोष सर्वत्र निनादू लागला.
शिव छत्रपतींच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन, “शिवसुत्रा” नुसार या कार्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी “जावळी” ही वॉररूम या कामाच्या प्रगती, साधनसामुग्री, गुणवत्ता आणि मानवी सुरक्षितता इत्यादी बाबींवर लक्ष ठेवून होती, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी सांगितले.
विदर्भातील ४५-४६ अंश तापमान, अंगातून निघणार्या घामाच्या धारा असतानाही मागील ५ दिवस सातत्याने आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, दाहक उन्हाच्या झळा सोसत, रात्रंदिवस एक करणाऱ्या, सर्व अभियंता, अधिकारी आणि कामगारांच्या चेहऱ्यावरील थकवा, तणावाची जागा, विश्वविक्रमाच्या घोषणेनंतर आनंदाने घेतली.
अखेर
राजपथ इन्फ्राकॉनने भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, राष्ट्राला ही अनोखी भेट दिली. आता अकोला- अमरावतीचे, विदर्भ, महाराष्ट्र आणि भारताचे नाव या निमित्ताने सातासमुद्रापार पोहोचले आहे.
ही अभूतपूर्व यशश्री खेचून आणण्यामागे कंपनीतील मनुष्यबळाची सांघिक भावना, दुर्दम्य इच्छाशक्ती, अदम्य जिद्द आणि अपरिमित चिकाटी फळाला आली.
या विक्रमी कामासाठी, प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सुरक्षितता अभियंता, सर्व्हेअर, इतर अनेक कर्मचारी आणि विविध सहयोगी कंपन्यांचे इंजिनिअर, कामगार याची निष्णात चमू अहर्निश तैनात होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टॅडेम रोलर,१ पी टी आर मशीन, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह अभियंते, पर्यवेक्षक, मदतनीस,कारागीर असे एकूण ७२८ योद्ध्यांचे,उच्च ध्येयाने प्रेरित, मनुष्यबळ इथे कार्यरत होते. स्थानिक लोकांसह, भारताच्या सर्व भागांतून आलेल्या लोकांचा हा मिनी भारतच होता. कामावरील यंत्रसामग्री दोषरहित ठेवण्यासाठी टाटा मोटर्स, रीटजेन आदी कंपन्यांचे ५ इंजिनिअर,तंत्रज्ञ आणि अन्य अधिकारी येथे सतत लक्ष ठेवून होते.निवास व्यवस्था,भोजन व्यवस्था,वाहन देखभाल दुरुस्ती कक्ष, पेट्रोल व डिझेल पंप इ.इथे कार्यरत असून, उन्हाळ्याच्या पार्श्भूमीवर वातानुकित व्यवस्था करण्यात आली होती.
या कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि तो तपासण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा माना कँपला उभारण्यात आलेली आहे. त्यानंतरच ३४,००० मेट्रिक टन बिटूमिनससह इतर सर्व साहित्य प्रत्यक्ष कामासाठी वापरण्यात आले.
गेल्या सहा महिन्यांत, रस्त्याचे चार थर तयार करण्यात आले असून, विक्रमाच्या वेळी हा पाचवा थर टाकण्यात आला. या विक्रमाची नोंद करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, गिनीज बुक टीमने मंजूर केलेली 22 तज्ज्ञांची चमू तीन शिफ्टमध्ये परीक्षण करीत होती. या तज्ञांमध्ये सर्वेक्षक, अधिवक्ता, टाइम-कीपर, रस्ता अभियांत्रिकी तज्ञ आणि नामांकित महाविद्यालयांचे डीन यांचा समावेश होता. या सर्व कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते देखरेख करीत होते.
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन
नागपुर येथे घेतला अखेरचा श्वास
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर श्री. सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे आज दिनांक ३ जुन २०२२ रोजी सायं. ७.१४ वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अकोला भारतीय जनता पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या निधनाने संघ परिवार ची फार मोठी हानी झाली. राष्ट्रभक्त विचारांची एक रूप, अनेक संकट सहन करून भारताला वैभवशाली करण्यासाठी तत्पर राहणारे व्यक्तिमत्व व सर्वांचे मार्गदर्शक निघून गेल्याने न भरून निघणारी हानी झाली अशा शब्दात खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल अर्चनाताई मसने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्युसमयी ९१ वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदा-या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. १९६७ मध्ये त्यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडाणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थीव शनिवार दिनांक ४ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. चंद्रपूर येथे आणण्यात येईल. त्यांची अंत्ययात्रा सायं. ४.३० वा. त्यांच्या कस्तुरबा चौक निवासस्थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
विकासाची दूरदृष्टी असलेले लोकनेते नितीनजी गडकरी आणि संजयभाऊ धोत्रे
देशात रस्त्यांचं जाळं निर्माण करत इन्फ्रास्ट्रक्चर च्या माध्यमातून विकासाची गंगा वाहायला लावणारे दूरदृष्टी नेतृत्व म्हणजे नितीनजी गडकरी,2014 ला मंत्री झाल्यानंतर 2015 साली नितीनजी नी नॅशनल हायवे नं 6 च्या रुंदीकरण कामाचे भूमिपूजन करण्या करता अकोला आले असता त्यांच्या समोर माजी केंद्रीय राज्य मंत्री व अकोला जिल्ह्याचे खासदार मा.संजयभाऊ धोत्रे यांनी अकोला शहरात उड्डाणपुल देण्याबाबत चा प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला जेष्ठ नेते व अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धनजी शर्मा,अकोला पूर्व चे आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष रणधीरभाऊ सावरकर यांनी अनुमोदन दिले होते त्याच प्रस्तावाचा विचार करत त्याच सभेत 137 कोटी रुपयांचा भरीव निधी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी घोषित केला होता आणि आज तो पूल बनून तयार असून येत्या 28 मे 2022 मा.नितीनजींच्याच हस्ते त्याचे लोकार्पण आहे.
अकोला शहरातील बस स्टॅन्ड चौकातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा म्हणून निशांत टॉवर ते जनता भाजी बाजार असा एक अंडर पास देखील त्याच आराखड्या नुसार मंजूर करून तयार करण्यात आला जेणेकरून बस स्थानकात जाणाऱ्या बसेस ला रस्त्यावरील वाहतुकीचा त्रास होणार नाही आणि गांधी रोडच्या बाजूने येणाऱ्या व्यक्ती ला डायरेक्ट जनता बाजाराजवळ या अंडर पासमुळे जात येईल अशी व्यवस्था केली गेली.तसेच डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ नॅशनल हायवे 6 मुळे दोन भागात वाटले गेले असून मुलांचे वसतिगृह आणि कृषी महाविद्यालय यांच्या मधनं नॅशनल हायवे गेल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते त्याला रोखण्या करता आणि नॅशनल हायवे च्या ट्राफिक ला विद्यापीठ परिसराचा त्रास होऊ नये म्हणून डॉ.पंदेकृवि परिसरात देखील एक अंडरपास याच आराखड्याच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात माजी केंद्रीय राज्य मंत्री व अकोल्याचे खासदार मा.संजयभाऊ धोत्रे यशस्वी ठरले.
ऐसे हैं विकास पुरुष केंद्रीय मंत्री.. मा. श्री. नितिन जी गड़करी
हमारे भारत देश की आजादी के पश्चात यातायात और परिवहन तथा सड़कों में पिछले 75 वर्षों में जितना विकास नहीं हुआ है उतना विकास पूरे देश में केंद्रीय भूतल परिवहन मंत्री श्री. नितिन गड़करी के मंत्रित्व काल में हुआ है. इन सभी कार्यों का पूरा श्रेय उन्हें ही जाता है. इसका मुख्य कारण है कि महानगर से लेकर छोटे छोटे गांवों तक देश भर में आज सड़कों का जो विशाल जाल दिखाई देता है वह सब इन्हीं के कारण दिखाई दे रहा है. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, बैंगलोर, हैदराबाद जैसे शहरों से लेकर दूसरी ओर सुदुर पूर्वोत्तर के दुर्गम पहाड़ी शहर भी सड़क परिवहन से जोड़े गए हैं. आसाम, मेघालय, हिमाचल, अरुणाचल प्रदेश और मान सरोवर तक तथा अन्य सीमावर्ती क्षेत्र में जहां सड़कों की कल्पना भी दूभर थी वहां आज सड़कों का जाल दिखाई दे रहा है. भारत का कोई भी कोना इस तरह के विकास से अछूता नहीं है. काश्मीर से लेकर कन्याकुमारी तक, भुज से लेकर त्रिपुरा तक कहीं भी जाएं तो सड़कों का निर्माण हर जगह दिखाई देता है. इस विकास पुरुष ने भाषा, प्रांत, राजनितिक पार्टी, अपना, पराया इन सबसे ऊपर उठकर सड़कों का विकास किया है.
अकोला को दिए उड़ान पुल
करीब तीन से साढ़े तीन वर्ष पूर्व एक दिन जब वसंतबाबू खंडेलवाल विधायक नहीं थे मा.नितिन जी गड़करी से मिले, उस समय अकोला के वरिष्ठ विधायक मा.श्री. गोवर्धन शर्मा भी उपस्थित थे, दोनों लोग अकोला के विकास को लेकर उनसे बातचीत कर रहे थे. वसंत बाबू ने कहा कि अकोला के विकास के लिए हर वर्ष बीस, तीस करोड़ रूपये केंद्र सरकार से मंजूर कीजिए, मा.नितिन जी ने कहा इतने में क्या होगा और उन्होंने अकोला के लिए उड़ान पुल मंजूर किए, जिसकी लागत करीब 200 करोड़ रू. के लगभग हुई है. इसी तरह बायपास पर करीब 175 करोड खर्च हुए है. और 28 मई 2022 को उन्हीं के हाथों अकोला कें उड़ान पुलों का और अंडर पास का लोकार्पण होने जा रहा है. सिर्फ अकोला ही नहीं, पूरे विदर्भ और पूरे महाराष्ट्र के साथ साथ पूरे भारत में सड़कों का जाल बिछाने के लिए मा.नितिन जी गड़करी लगातार सक्रिय रहे हैं.
28 मई को हो सकती है विकास की घोषणाएं
मा.श्री. नितिन जी गड़करी दोनों पुलों के लोकार्पण के लिए अकोला आ रहे हैं. इस अवसर पर वे अकोला शहर तथा जिले के विकास के लिए केंद्र सरकार की तरफ से निश्चित ही कुछ नये प्रकल्पों की घोषणा कर सकते हैं. इस संभावना से इन्कार नहीं किया जा सकता है.
अकोला को आया महानगर का रूप
नवनिर्मित दोनों उड़ान पुल और अंडर पास तथा बायपास का कार्य यह अकोला के लिए गौरव की बात है. इन उड़ान पुलों और अंडर पास से शहर के एक पूरे क्षेत्र की यातायात समस्या हल होगी. यहां के दोनो उडानपूल बहुत ही अत्याधुनिक स्वरुप के हैं. अकोला शहर को महानगर का दर्जा मनपा के रूप में सन 2001 में प्राप्त हुआ हो लेकिन विकास न होने के कारण यहां की परिस्थिति एक छोटे शहर के समान ही थी. महानगर की सुविधाएं यहां से दूर थीं परंतु भविष्य दृष्टा मा.नितिन गड़करी के कारण आज यहां दो उड़ान पुलों और अंडर पास के कारण अकोला शहर को महानगर का स्वरूप प्राप्त हुआ है. इसी तरह मा.नितिन जी के कारण राष्ट्रीय महामार्ग क्र.6 का नवीनीकरण, दो रेलवे ओवर ब्रिज भी हमें प्राप्त हुए हैं. ऐसे विकास पुरुष मा.नितिन जी गड़करी का हम अकोला आगमन पर हार्दिक स्वागत करते हैं, उनका हार्दिक आभार मानते हैं.
मा. नितिन जी आपका राजराजेश्वर नगरी में हार्दिक स्वागत है!
शुभेच्छुक :-
* डॉ. विजय तोष्णीवाल
* डॉ. श्याम लोहिया
* सुनील हातेकर
* दीपक चांडक
* अशोक धानुका
* दिलीप चौधरी
* अरुण खेतान
* अॅड. सुशील शर्मा
* विधायक वसंतजी खंडेलवाल मित्र परिवार, अकोला
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाव्दारे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ सुरु
खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला:नोंदणी आवश्यक
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: गरोदर माता व नवजात बालक रुग्णांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी रुग्णवाहीका उपलब्ध व्हावे याकरीता जिल्हा स्त्री रुग्णालयाव्दारे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ सुरु केले आहे. शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास खाजगी वाहन किंवा रुग्णवाहिका वापरता येईल. अशा वाहनाचे भाडे प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे संबधित रुगांनाच्या खात्यात रक्कम अदा केल्या जाईल. याकरीता रुग्णाला ॲप्सवर नोंदणी करणे आवश्यक राहिल, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक यांनी दिली.
प्रसुती पश्चात 42 दिवसपर्यंतच्या गरोदर माता व एक वर्षापर्यंतच्या नवजात बालकांना तातडीच्या उपचाराकरीता शासकीय व खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता रुग्णांना ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ डाऊनलोड करुन नोंदणी करणे आवश्यक राहिल. ज्या रुग्णाने खाजगी वाहन किंवा रुग्णवाहिकेचा वापर केला असेल अशा संबधीत रुग्णांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहोचल्यानंतर बँकेचे पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स प्रत जिल्हा स्त्री रुग्णालयात जमा करावी. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे वाहन भाडे ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल. शासकीय रुग्णवाहिकेचा वापर झाल्यास लाभ मिळणार नाही तर खाजगी वाहण किंवा रुग्णवाहिका वापर करताना ॲप्सवर नोंदणी करणे आवश्यक राहिल यांची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेले दर याप्रमाणे : मारूती व्हॅनचे महानगर पालिका क्षेत्रातील दर पाचशे रुपये प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगर पालिका क्षेत्र सोडून 1 हजार रुपये व जिल्ह्याबाहेर 11 रुपये प्रति कि.मी. प्रमाणे राहिल. टाटा सुमो व मॅटॅडोरचे महानगर पालिका क्षेत्रातील भाडेदर सहाशे रुपये प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगर पालिका क्षेत्र सोडून 1 हजार 400 रुपये तर जिल्ह्याबाहेर 12 रुपये प्रती कि.मी. प्रमाणे राहिल. टाटा 407 किंवा स्वराज मझदाचे महानगर पालिका क्षेत्रातील भाडेदर सातशे प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगरपालिका क्षेत्र सोडून 1 हजार 300 रुपये तर जिल्ह्याबाहेर 13 रूपये प्रती कि.मी. प्रमाणे राहिल. आय.सी.यु. अथवा वातानुकूलीत वाहनाचे महानगरपालिका क्षेत्र सोडून व जिल्ह्याबाहेर वातानुकूलीत यंत्रणा बसविली असल्यास नमूद दरात 15 टक्के वाढ देय राहिल. तसेच 100 कि. मी. च्या वर 15 रुपये प्रती कि.मी. प्रमाणे रक्कम संबंधीतांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने रक्कम जमा करण्यात येईल, असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.